“..तर न्यायालयातच स्वतःचे घर बांधावे लागेल”; आशिष शेलारांचा संजय राऊतांना इशारा
मुंबई : नारायण राणे हे पाठमागील काही दिवसांपासून शिवसेना, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर तिव्र शब्दात निशाणा साधत आहेत. राणे यांनी संजय राऊत यांच्यावर वेळोवेळी अनेक आरोप केले आहेत. नारायण राणेंनी माफी मागितली नाही तर न्यायालयात खटला दाखल करणार असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊतांनी लक्षात घ्यावे की, तुम्हाला नोटीस पाठवण्याचे अधिकार आहे. पण तुमचे बोलणे, शिवराळ भाषा, मराठा समाजांसह अन्य लोकांवरील वक्तव्ये तसेच नर्स, डॉक्टरांबाबत वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावर जर दावे दाखल झाले तर एखाद्या न्यायालयातच स्वतःचे घर बांधावे लागेल, असं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी म्हटलं आहे.
नारायण राणेंवरील आरोपानंतर निलेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी संज्याने राणेसाहेबांवर बदनामीचा दावा दाखल केलाय, मुळात बदनामीचा दावा दाखल करायला मार्केटमध्ये कसलीतरी इज्जत असावी लागते. ज्याचं नाम नाही तो बदनाम होऊ शकत नाही, असं म्हटलं आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी नारायण राणे सार्वजनिक मंचावरून तसेच माध्यमातून माझ्याविषयी आणि शिवसेने बाबत बिनबुडाचे आरोप करीत असतात. हे आरोप त्यांनी सिध्द करावेत. अन्यथा माफी मागावी. माझे वकील सार्थक शेट्टी यांच्या मार्फत मी त्यांना कायदेशीर कारवाई बाबत नोटीस बजावली आहे. कर नाही तर डर कशाला? जय महाराष्ट्र!, असं म्हटलं आहे.