breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

टोमॅटो दरवाढीबाबत विचारताच स्मृती इराणी पत्रकारावर भडकल्या..

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून टोमॅटोचे दर गगनाला भीडले आहेत. मधल्या काळात टोमॅटोचे दर २५० ते ३०० रूपये प्रतिकिलो इतका होता. यामुळे देशभर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान, एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने टोमॅटोच्या वाढत्या दराबाबत प्रश्न विचारला असता स्मृती इराणी यांनी संताप व्यक्त केला.

टोमॅटोचा दर २५० ते ३०० रुपये प्रतिकिलो इतका झाला , तेव्हा तुमच्या घरात यावर चर्चा होत होती का? असा प्रश्न विचारला असता स्मृती इराणी यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी टिव्ही पत्रकार सुधीर चौधरींना प्रतिप्रश्न केला, सुधीरजी, तुम्ही जेव्हा तुरुंगात होता, तेव्हा काय झालं? असं मी तुम्हाला विचारू शकते. टोमॅटो दरवाढीवरून प्रश्न विचारणं हा खासगी प्रश्न आहे, असं ही स्मृती इराणी म्हणाल्या.

हेही वाचा – छगन भुजबळांच्या ‘त्या’ विधानाचं काँग्रेसकडून समर्थन? विजय वडेट्टीवार म्हणाले..

दरम्यान, या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. २०१२ मध्ये तत्कालीन ‘झी न्यूज’चे संपादक सुधीर चौधरी यांच्यासह ‘झी बिझनेस’चे संपादक समीर अहलूवालिया यांच्या लाचखोरी प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी दोघांना २० दिवस तुरुंगातही जावं लागलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button