breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रमुंबई

होळीनंतर उन्हाचा चटका वाढणार; पारा 40 पार जाण्याची शक्यता

​ग्लोबल वार्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढीमुळे वातावरणात बदल

पुणे: ग्लोबल वार्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढीमुळे वातावरणात बदल होत आहेत. यंदा पावसाने ओढ दिली. तसेच राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. तसेच गेल्या काही वर्षांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. यंदा एल निनोचा फारसा प्रभाव नसल्याने सध्या उन्हाचे चटके बसत नसले तरी एप्रिल महिन्यात राज्यात अनेक भागात पारा 40 अंशांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यंदा मार्च महिन्यातही रात्री आणि पहाटे गारवा जाणवत असून दुपारी कडक उन असते. आता उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी होत असून राज्यात उन्हाचा ताप वाढणार आहे. दरवर्षी विदर्भ, मराठवाडा, खान्देश या भागात एप्रिल मे महिन्यात पारा 45 अंशांवर जातो. यंदा मार्च महिन्यात तापमानात जास्त वाढ झाली नसली तरी एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा चांगलाच ताप जाणवणार आहे.

उत्तरेतही थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी होत असून उत्तर हिंदुस्थानातही तापमानात वाढ होत आहे. राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड येथे कमाल तापमानात वाढ होत आहे. आता होळीनंतर राज्यासह देशात उन्हाचा ताप वाढणार आहे. तसेच काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे दुपारच्यावेळी घराबाहेर पडू नये आणि उन्हापासून योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​ ​ग्लोबल वार्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढीमुळे वातावरणात बदल होत आहेत. यंदा पावसाने ओढ दिली. तसेच राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. तसेच गेल्या काही वर्षांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. यंदा एल निनोचा फारसा प्रभाव नसल्याने सध्या उन्हाचे चटके बसत नसले तरी एप्रिल महिन्यात राज्यात अनेक भागात पारा 40 अंशांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली

ग्लोबल वार्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढीमुळे वातावरणात बदल होत आहेत. यंदा पावसाने ओढ दिली. तसेच राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. तसेच गेल्या काही वर्षांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. यंदा एल निनोचा फारसा प्रभाव नसल्याने सध्या उन्हाचे चटके बसत नसले तरी एप्रिल महिन्यात राज्यात अनेक भागात पारा 40 अंशांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यंदा मार्च महिन्यातही रात्री आणि पहाटे गारवा जाणवत असून दुपारी कडक उन असते. आता उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी होत असून राज्यात उन्हाचा ताप वाढणार आहे. दरवर्षी विदर्भ, मराठवाडा, खान्देश या भागात एप्रिल मे महिन्यात पारा 45 अंशांवर जातो. यंदा मार्च महिन्यात तापमानात जास्त वाढ झाली नसली तरी एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा चांगलाच ताप जाणवणार आहे.

उत्तरेतही थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी होत असून उत्तर हिंदुस्थानातही तापमानात वाढ होत आहे. राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड येथे कमाल तापमानात वाढ होत आहे. आता होळीनंतर राज्यासह देशात उन्हाचा ताप वाढणार आहे. तसेच काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे दुपारच्यावेळी घराबाहेर पडू नये आणि उन्हापासून योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button