तुम्ही राज्याचे प्रतिनिधी आहात, मंत्रिपदाची शपथ घेतली आहे हे भान ठेवून वागा’
मुंबई: तुम्ही राज्याचे प्रतिनिधी आहात. मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तुमच्यावर जबाबदारी आहे. तुम्ही-आम्ही सर्वानी संविधान, कायदे, नियम याचा आदर केला पाहिजे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार सत्ताधाऱ्यांना फटकारले. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे चुकत असेल तर त्यांना मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात आणून द्यायला हवे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये वाचाळवीरांचे प्रस्थ वाढले आहे. तोंडाला येईल ते काहीही बोलतात. प्रवक्त्यांनी काय बोलाले, याबाबत मी बोलणार नाही. मात्र ज्या प्रकारे मंत्रिमंडळातील सदस्य बोलतात. त्यामुळे मंत्रिमंडळाची प्रतिमा मलिन होते. वाचाळवीरांचे प्रस्थ वाढले. त्यांना आवरा, असा इशारा पवार यांनी दिला. अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीदरम्यान दिवसाढवळय़ा गोळीबार होतो. तर सरकार काय करत होते? पोलीस यंत्रणा कुठे होती? ठाणे शहरात शिंदे-ठाकरे गटात संघर्ष झाला. असा संघर्ष फायद्याचा नाही.