breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

एसआरए प्रकल्पातील घर खरेदीधारक आता बेघर होणार नाही; 50 लाख नागरिकांना मोठा दिलासा

मुंबई | महाईन्यूज

आपल्या कष्टाच्या पैशांनी मुंबई आणि ठाण्यातील गोरगरिबांनी एसआरए प्रकल्पात मूळ मालकांकडून घरे खरेदी केलेली आहे.एसआरए मार्फत ज्या लोकांना घरं मिळाली आहेत. मात्र आज १० वर्षानंतरही त्यांच्या नावावर घर होत नाही. पैसे भरूनही त्यांना स्वतःच्या मालकी हक्काचे घर मिळत नाही. यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. एसआरए प्रकल्पात घरे घेतलेली ५० लाखांपेक्षा जास्त लोकं आता बेघर होण्याच्या मार्गावर आहेत.याबाबत मागाठाणे येथील शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे सदर महत्वाची बाब गृहनिर्माण मंत्र्याच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे.

यावेळी एसआरए प्रकल्पात घेतलेले घर खरेदीधारकांच्या नावे असलेला पूर्वीचा कालावधी 10 वर्षां ऐवजी 5 वर्षे करावा,तसेच रेडी रेकनर प्रमाणे दंडाची रक्कम १० टक्के ऐवजी ठराविक कमी रक्कम घेऊन घरे त्यांच्या नावावर करावी अशी आग्रही मागणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे केली अशी माहिती सुर्वे यांनी दिली आहे. सदर घर खरेदी धारकांपैकी कोणीही बेघर होणार नाही, तसेच घर नावावर होण्याचा पूर्वीचा कालावधी कमी करून आता ५ वर्षे करणार असे ठोस आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.त्यामुळे मुंबई ठाण्यातील 50 लाख एसआरए खरेदीधारक बेघर होणार नसून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अशी माहिती आमदार सुर्वे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button