breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
भर उन्हात रिक्षाने घेतली पेट, दोन महिला भाजल्या
नागपूर : रविनगर भागातून एक रिक्षा जात असताना रिक्षाने पेट घेतला. यामध्ये बसलेल्या दोन महिला काही प्रमाणता भाजल्या. इतर एक प्रवसी व चालक सुरक्षित आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली. यावेळी रस्तावर एकच गोंधळ उडाला होता.
यंदा विदर्भ चागंला तापत आहे. विदर्भातील पारा ४५ अंशाच्या पलिकडे गेला आहे. चालत्या रिक्षाने अचानक पेट घेतल्याच्या घटनेने भर घातली आहे. दुपारच्या वेळी रिक्षा रविनगर चौकातून जात असताना अचानक त्याला आग लागली. यात बसलेले प्रवासी घाबरले आणि त्यांनी आरडाओरड केली. रिक्षा चालकाने प्रसंगावधान राखत त्याला रस्त्याच्या कडेला नेले. मात्र तोपर्यंत दोन महिलांना त्या आगीच्या झळांनी घेरले. या महिलांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.