breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

सर्पाना पकडून राणीच्या बागेत सोडण्याचा पालिकेचा ठराव

सेनेच्या सूचनेला नगरसेवकांचा एकमुखी पाठिंबा

मुंबई : मनुष्य वस्तीत आढळणाऱ्या सर्पाना पकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयातील (राणीची बाग) सर्प उद्यानात सोडण्याचा ठराव महापालिकेने एकमताने मंजूर केला.

चुकून वस्तीत आलेल्या सर्पाना मारून टाकण्याच्या प्रकारामुळे त्यांच्या दुर्मीळ जाती नष्ट होत आहेत. हे लक्षात घेऊन पालिकेने सर्प संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, सर्पमित्रांची नियुक्ती करावी आणि पकडलेल्या सर्पाना संजय गांधी राष्ट्रीय उद्यान किंवा राणीच्या बागेतील सर्प उद्यानात सोडावे, अशी मागणी करणारी ठरावाची सूचना शिवसेना नगरसेविका वैशाली शेवाळे यांनी पालिका सभागृहात सादर केली होती. ती सभागृहाने एकमताने मंजूर केली.

सर्पमित्रांची माहिती जमवणार

मुंबईत कोणत्याही भागात सर्प आढळून आल्यास त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी, असे आवाहन पालिकेने मुंबईकरांना करावे. सर्पमित्रांची नावे, त्यांचे संपर्क क्रमांक आदी माहिती पालिकेच्या विभाग कार्यालयात उपलब्ध करावी. पालिकेच्या संकेतस्थळावर किंवा जाहिरातीद्वारे ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button