Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पुढचे 48 तास महत्त्वाचे ! जोरदार लॉबिंग,, सेटिंग, फिल्डिंग सुरू… मंत्रिपदासाठी इच्छुकांच्या भेटीगाठी वाढल्या

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या दोन दिवसात होणार आहे. हिवाळी अधिवेशनातच रविवारी नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आपल्याच गळ्यात मंत्रिपदाची माळ पडावी म्हणून इच्छुकांची जोरदार लॉबिंग, सेटिंग, फिल्डिंग सुरू झाली आहे. खासकरून मंत्रिपदासाठी शिंदे गटात मोठी लॉबिंग सुरू आहे. पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. तानाजी सावंत, भरत गोगावले, संजय शिरसाट आणि उदय सामंत हे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. कुणाला मंत्रिपदं द्यायची आणि कुणाला नाही याची चर्चा या बैठकीत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

माहितीनुसार, येत्या रविवारी फडणवीस सरकारचा विस्तार होणार आहे. या पार्श्वभूमीवर तानाजी सावंत, भरत गोगावले, संजय शिरसाट आणि उदय सामंत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गेले आहेत. मंत्रिमंडळात 13 मंत्र्यांनाच स्थान मिळणार असल्याने कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं आणि कुणाला नाही यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात 14 महापालिकेच्या निवडणुका होणार आहे, त्यामुळे कोणत्या भागात किती मंत्रिपदं द्यायची, प्रदेशनिहाय मंत्रिपदं द्यायची का? पक्ष मजबूत करण्यासाठी कोणत्या भागावर जोर द्यावा लागेल याची चर्चाही या बैठकीत करून नंतरच मंत्रिपदाचं वाटप केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा –  महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शिंदे गटाचे अनेक आमदार मंत्रीपदाची आस लावून बसले होते. पण त्यातील फार थोड्यांनाच संधी मिळाली होती. अजितदादा यांचा महायुतीत प्रवेश झाल्यानंतर शिंदे गटाच्या वाट्याला येणारी मंत्रिपदे कमी झाली होती. त्यामुळे शिंदे गटाच्या अनेकांचा हिरमोड झाला होता. त्यानंतर सरकारच्या अखेरच्या काळात काही आमदारांना महामंडळ देऊन त्यांची समजूत काढण्यात आली होती. मात्र, आता फडणवीस सरकार पाच वर्षासाठी असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला फुल्ल टर्म मंत्रिपद हवं आहे, ज्यांना मागच्यावेळी मंत्रिपद मिळालं नव्हतं ते आता मंत्रिपदासाठी दावा ठोकून बसले आहेत. त्यामुळे या इच्छुकांची एकनाथ शिंदे कशी समजूत काढतात? किंवा त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकतात का? हे पाहावं लागणार आहे.

फडणवीस सरकार पाच वर्ष राहणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला मंत्री बनायचं आहे. मात्र इच्छुक जास्त आणि मंत्रिपदं कमी अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे अडीच अडीच वर्ष प्रत्येकाला मंत्रिपद देण्याचं शिंदे गटात घटत आहे. हा फॉर्म्युला जर लागू केला तर पहिली अडीच वर्ष आपल्यालाच मिळावी म्हणून इच्छुकांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button