“दहा वर्षानंतर मुस्लिम प्रधानमंत्री होईल”; कालीचरण महाराजांचं विधान
तुम्ही सगळे बुरख्यात जाल तुमच्या खतन्या होतील
पुणे : बारामतीत लव जिहाद, धर्मांतर गोहत्या विरोधी कायदा तसेच तीर्थक्षेत्रांना पर्यटन स्थळाचा दर्जा देऊ नये यासाठी हिंदू जनगर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चा वेळी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर आयोजित सभेत कालीचरण महाराज यांनी दहा वर्षानंतर मुस्लिम प्रधानमंत्री होईल, असं विधान केलं आहे.
दहा वर्षानंतर मुस्लिम प्रधानमंत्री होईल. शरिया कायदा लागू होतील. तुम्ही सगळे बुरख्यात जाल तुमच्या खतन्या होतील. गाई कापल्या जातील मंदिरे उद्ध्वस्त होतील, असे प्रखर विधान प्रखर हिंदू वक्ते कालीचरण महाराज यांनी केले.
भारतात हिंदूंची लोकसंख्या 94 कोटी तर 46 कोटी कुणाची आहे. याचा विचार करा दररोज 65 हजार मुलं जन्माला येत आहेत यापैकी चाळीस हजार मुस्लिम तर पंचवीस हजार हिंदूंची मुले जन्माला येत आहेत. याचा विचार केला पाहिजे, असेही कालीचरण महाराज म्हणाले.