जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश
मुंबई – महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याने अंधश्रद्धेतून फसवणुकीच्या घटना घडतात. त्यामुळे जादूटोणाविरोधी कायदा प्रचार व प्रसार समितीने कामकाजाला गती देवून राज्यात जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्दश उमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहेत.
आज उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या समिती कक्षात एक बैठक पार पडली. या बैठकीत अजित दादा यांनी समितीच्या कामाचा आढावा घेऊन, काही महत्वपूर्ण निर्देश दिले. त्यांनी सांगितले कि नरबळी, तसेच अनिष्ठ व अघोरी प्रथा, व जादू टोना यांना प्रतिबंध घालण्याकरिता आणि त्यांचे समूळ उच्चटन करण्याकरिता २०१३ मध्ये हा अधिनियम संमत करण्यात आला . आणि असा कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे . म्हणूनच जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे . त्यासही या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी, प्रभावीपणे काम करावे. आजही अंधश्रद्धेमुळे अनेक गरीब आणि असहाय लोकांची फसवणूक होत असते. अशा लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. जादूटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीचे गठन करण्याबाबत, सामाजिक न्याय विभागाने कार्यवाही करावी. गृह विभागाने सुधा आलेल्या तक्रारीवर योग्य कार्यवाही करावी. प्राध्यापक श्याम मानव यांनी केलेल्या सूचनांबाबत शासन सकारात्मक असून राज्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून सर्व निर्णय घेण्याची ग्वाही उप मुख्यमंत्र्यांनी दिली.