breaking-newsमनोरंजन

आव्हानात्मक भूमिका मिळत नाहीत – भूमी पेडणेकर

भूमी पेडणेकर बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावर आलेली नाही. तिला हव्या तशा आव्हानात्मक भूमिका मिळत नसल्यानेच तिने नवीन सिनेमा स्वीकारलेला नाही. भूमीने “दम लगाके हैय्या’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्याशिवाय “लस्ट स्टोरीज’मध्येही तिने लक्षवेधक भूमिका केली होती. तिला तशाच रोलची अपेक्षा आहे. भूमीवर झोया अख्तरचा विशेष प्रभाव पडला आहे. झोया अख्तर बरोबर काम करण्याची संधी मिळणे आपल्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे.

जेंव्हा तिने “लस्ट स्टोरीज’ची कथा वाचली, तेंव्हा तशीच आव्हानात्मक भूमिका आपल्याला हवी असल्याचे तिच्या ध्यानात आले. म्हणूनच “लस्ट स्टोरीज’मध्ये तिने काम केले. एवढ्या कमी सिनेमांमध्ये काम का करते असे तिला अनेकजण विचारतात. पण आपल्याला ऑफर केल्या जाणाऱ्या रोलमध्ये काहीच आव्हानात्मक नसते. मग अशा रोलमध्ये वेळ का वाया घालवायचा. त्यापेक्षा असे रोल न केलेले बरे, असा विचार करून ती या रोलना नकार देत आहे.

“टॉयलेट एक प्रेमकथा’ हा तिचा आतापर्यंत अधिक चर्चेचा सिनेमा होता. भूमीचा पुढचा सिनेमा असणार आहे “सोन चिरैय्या’. यामध्ये तिच्याबरोबर सुशांत सिंह राजपूत, रणवीर शौरी आणि आशुतोष राणा सारखे कलाकार असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button