ऑक्सिजनसाठी वडाच्या रोपांची लागवड करणे काळाची गरज, माजी महापौर शैलजा मोरे यांचे प्रतिपादन
- वटपौर्णिमेनिमित्त महिलांच्या हस्ते वृक्षारोपण
- स्वदेशी जागरण मंच व रोपवाटिका ग्रुपचा पुढकार
पिंपरी / महाईन्यूज
निगडी प्राधिकरणातील सेक्टर २६ मधील मल्लिकार्जुन मंदिर परिसरात स्वदेशी जागरण मंच व रोपवाटिका ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी वडाचे रोप लावून त्याची पूजा करून सण साजरा केला.
यावेळी माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजा मोरे, निवेदिता कच्छवा, उत्कर्षा कुलकर्णी, शिल्पा बिबीकर, स्मिता मोडक यांची प्रमुख उपस्थिती होती. परिसरातील उपस्थित महिलांनी वडाच्या रोपाचे संगोपन करण्याचा संकल्प यावेळी केला.
माजी उपमहापौर शैलजा म्हणाल्या की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात वटपोर्णिमा साजरी होत आहे. कोरोनामुळे नागरिकांना ऑक्सिजनचे महत्व समजले आहे. त्यासाठी वृक्षारोपण होणे ही काळाची गरज आहे. वटपौर्णिमा या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडामुळे सर्वात जास्त ऑक्सिजन मिळतो. अश्या या बहुउपयोगी झाडाची पूजा करून आपण त्याचे संवर्धन करावे, हा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी दरवर्षी वडाचे झाड लावून त्याची पूजा करण्याचा संकल्प आम्ही केला आहे.