एकेकाळच्या या टॉप अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये करायचंय कमबॅक; म्हणाली, “आता मुलं स्थिरावली आहेत…”
![The one-time top actress wants to make a comeback in Bollywood; Said, "Now the children are settled."](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/meenakshi-seshadri-want-to-comeback-after-long-gap-from-film-industry-1.jpeg)
मुंबई |
नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक नावाजलेली अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी शेषाद्री. ‘हीरो’, ‘दामिनी’, ‘घायल’ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या मीनाक्षीने लग्नानंतर सिनेसृष्टीला रामराम ठोकला. मात्र आता मोठ्या ब्रेकनंतर मिनाक्षीला बॉलिवूडमध्ये कमबॅक करायचंय. एका मुलाखती दरम्यान तिनं हा खुलासा केलाय. “जर भविष्यात एखाद्या चांगल्या भूमिकेसाठी ऑफर आली तर त्यावर मी विचार करेल”, असं यावेळी मिनाक्षीने सांगितलंय.
अभिनेत्री मिनाक्षी गेल्या २६-२७ वर्षांपासून फिल्मी दुनियेपासून दूर आहे. जेव्हा तिने करियरमध्ये भरारी घ्यायला सुरवातच केली होती, त्यावेळी १९९५ साली तिने लग्न केलं आणि पतीसह ती अमेरिकेत राहू लागली. आता सध्या तिची एक मुलगी आणि एक मुलासह ती राहतेय. मुलगी नोकरी करतेय तर मुलगा शिक्षण घेतोय. इतक्या वर्षात तिने तिच्या कुटुंबाला प्राधान्य देत अमेरिकेतल्या मित्र-मैत्रिणींसोबत आपला वेळ घालवत आहे. आता तिची दोन्ही मुलं स्थिरावली आहेत. त्यामुळे आता ती पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याचा विचार करतेय. अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री तिच्या अदाकारीला योग्य न्याय देतील अशा स्किप्ट आणि भूमिकेच्या शोधात आहे.