मुंबईच्या दिशेने निघालेल्या शिखांच्या रॅलीला पोलिसांनी अडवलं
नवी दिल्ली – दिल्लीच्या वेशीवर शेतकरी आंदोलनाचा आजचा 13वा दिवस आहे. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून आज ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. या भारत बंदचा वणवा अवघ्या देशात भडकला आहे. ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. तर मुंबईच्या दिशेने निघालेल्या शिखांच्या रॅलीला पोलिसांनी अडवले आहे. मानखुर्द येथे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवले असल्याने वाशी उड्डाणपूलावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. परिणामी मुंबईला जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
वाचा :-महाविकास आघाडीचा पुण्यातील मोर्चा पोलिसांनी रोखला
दरम्यान, केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांचा प्रचंड आक्रोश होत आहे. आज पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला देशभरातील शेतकऱ्यांसह अनेक संघटना, विरोधी पक्षांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून महाराष्ट्रातही कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
वाचा :-शेतकरी भारत बंदचे फोटो सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई, खासदार राजीव सातव यांचा आरोप