breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारणराष्ट्रियव्यापार
कांदा निर्यातीवर बंदी का? केंद्र सरकारच्या पोटात का दुखतंय? – स्वाभिमानी शेतकरी संघटना
पुणे: शेतकऱ्याच्या घामाला भाव मिळत असेल तर केंद्र सरकारच्या पोटात का दुखत आहे? कांदा निर्यात झाल्यास शेतकऱ्याला पैसा मिळतो, ही निर्यात थांबवल्यास कांदा घरीच पडून-सडून जातो. आणि शेतकऱ्याने घातलेला खर्चही त्यातून निघत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने केंद्र सरकार कांदा निर्यात बंदी त्वरीत मागे घ्यावी. कांदा हा नाश्वंत माल आहे. तो वेळेत विकला गेला नाही तर त्याचा काहीही फादा होत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी त्वरीत मागे घ्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केलेली आहे. तसेच, सरकारने आपला निर्णय बदलला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलेला आहे.