breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus|देश दिव्यांनी उजळला; पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद
मुंबई | ५ एप्रिलला ९ वाजता ९ मिनिटे सर्वांनी लाईट्स बंद करुन दिवे लावा असे आवाहनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. याला प्रतिसाद देत देशभरातील जनतेने आपापल्या घरातील दिवे बंद केले आणि पणत्या, मेणबत्या, मोबाईल टॉर्च पेटवले.
रात्री ठिक नऊ वाजता शहरातील लाईट्स बंद झाल्या. आणि प्रत्येकाच्या खिडक्यांमधून दिवे, पणत्या दिसू लागल्या. जनतेने घोषणा तसेच शंखनाद करत करत या आवाहनाला प्रतिसाद दिला.