वेरुळ आणि अजिंठासह सर्व पर्यटनस्थळे बंद
19 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत शहरातील सर्व पर्यटनस्थळे बंद राहणार
औरंगाबाद- देशात वाढत्या कोरोनाच्या प्रभावामुळे औरंगाबादमधील जगविख्यात अजिंठा आणि वेरुळ लेण्या बंद करण्याच्या निर्णय प्रशासनाने घेतला आहे. येत्या 19 मार्चपासून 7 एप्रिलपर्यंत वेरुळ आणि अजिंठा लेणी बंद राहणार आहेत.
कोरोनाच्या प्रभावामुळे फक्त अजिंठा आणि वेरुण लेण्यासोबतच जाजमहलची प्रतिकृती असलेला बीबी-का-मकबारा, औरंगाबाद लेणी, दौलताबाद (देवगिरी) किल्ला, पानचक्की इत्यादी पर्यटन स्थळेही प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सांगताना जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले की, ” पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येणारी सर्व पर्यटन स्थळे 19 मार्चपासून 7 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. पुढील दोन दिवसात या स्थळांवर येणाऱ्या परदेशी नागरिकांची याआधीच स्क्रीनींग झालेली असल्यामुळे त्यांना येत्या दोन दिवसात ही पर्यटन स्थळे पाहता येणार आहेत.”