तिसरे मूल जन्माला घालणाऱ्यांचा मताधिकारच काढा : रामदेव बाबा
पाटणा | महाईन्यूज
लोकसंख्या नियंत्रणासाठी कठाेर कायदा करण्याची गरज आहे. दाेनपेक्षा अधिक मुले जन्माला घालणाऱ्या नागरिकांचा मताधिकार काढला पाहिजे, असे मत योगगुरू रामदेवबाबा यांनी सोमवारी व्यक्त केले. चौथे मूल जन्माला घातले तर त्या मुलाचाही मताधिकार काढला पाहिजे, असे ते म्हणाले. लोकांना मुले जन्माला घालण्याचे स्वातंत्र्य आहे, पण मर्यादेपेक्षा जास्त नको आहेत. मर्यादेबाहेर गेलेली लोकसंख्या ओझे बनून राहील आणि जगातील इतर देशांनी लाेकसंख्या नियंत्रणासाठी पावले उचलली आहेत. आपल्या देशातही याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. मुले दोनच चांगली, असे ते म्हणाले आहेत.
भास्कर उत्सवात ‘बिझनेस टॉक शो’मध्ये पत्रकार सुमीत अवस्थी यांनी प्रश्न विचारला की, शिक्षा देण्यापेक्षा प्रोत्साहन दिले पाहिजे, कारण बळजबरी करून चालणार नाहीये. संजय गांधी याचे उदाहरण समोर आहे. उत्तरात बाबा म्हणाले, मूळ प्रश्न लोकसंख्या नियंत्रणाचा आहे. कायदा तर व्हायलाच हवा आहे.