अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर दगडफेकप्रकरणी ७६५ जणांना अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/accident-dagad-fek.jpg)
अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या ७६५ जणांना सुरक्षा दलांनी अटक केल्याची माहिती गृहमंत्रालयाने मंगळवारी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.
जम्मू-काश्मीरमध्ये ५ ऑगस्टनंतर दगडफेकीच्या घटनांमध्ये घट झाली आहे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. दगडफेक आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित १९० प्रकरणांमध्ये ७६५ जणांना अटक करण्यात आली आहे, दगडफेकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी धोरण आखण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.
- दहशतवाद्यांचाअड्डा उद्ध्वस्त
जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्य़ातील दहशतवाद्यांच्या छुप्या अड्डय़ांमधून सुरक्षा दलांनी एक बिनतारी यंत्र संच आणि स्फोटके हस्तगत केली. सुरनकोटे जवळच्या जंगलात संशयास्पद हालचाली दिसल्याची माहिती गावकऱ्यांनी सुरक्षा दलांना दिली होती, त्यानुसार तेथे शोधमोहीम हाती घेण्यात आली होती.
सुरक्षा दलांनी धैरच्या जंगलातील छुप्या अड्डय़ांमधून सात सुरुंग, एक गॅस सिलेंडर आणि बिनतारी यंत्र संच जप्त केले. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.