breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

5 जुलैपर्यंत मास्क न घातल्यानं एकूण 88 जणांवर गुन्हा दाखलं

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहे. बाहेर फिरताना मास्क वापरणं सक्तीचं करण्यात आलं आहे. मात्र तरी सुद्धा काही बेजबाबदार नागरिक मास्क न घालताच फिरत आहेत. त्यांच्यामुळे इतर लोकांनाही धोका निर्माण करत आहेत.आणि म्हणूनच पोलिसांनी अशा नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. नियम न पाळणाऱ्या नागरिकांसाठी पालिकेनं नवे नियम आणलेत. मास्क वापरण्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेनं नवा आदेश जारी केला आहे. यापुढे जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. दरम्यान मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार, गेल्या सहा दिवसांत 88 नागरिक मास्क न घालता घराबाहेर पडलेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं गेल्या सहा दिवसांत केवळ 88 जणांवर मास्क न घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नेहमी जागरुक असलेल्या बीएमसीला रविवारी केवळ एकच मास्क न घातलेला व्यक्ती आढळला.अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर्स, पोलिस, नर्सेस अहोरात्र मेहनत घेताहेत. अशातच कोरोनाला रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावणं, सॅनिटायझरचा वापर करणे तसंच सोशल डिस्टन्सिंग ठेवणं हे महत्त्वाचं आहे. तोंडाला मास्क लावूनच बाहेर फिरणं प्रशासनानं अनिवार्य केलं आहे.

मुंबई महापालिकेनं 8 एप्रिलला सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं अनिवार्य करण्याचा आदेश दिला होता. तसंच या नियमाचं उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करुन अटक करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर पालिकेनं 9 एप्रिलपासून दंड वसूल करण्यास सुरुवात केली. पालिका प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. यानुसार महापालिकेनं जून अखेरपर्यंत दररोज सरासरी 25 जणांवर कारवाई केली आहे.आणि 5 जुलैपर्यंत एकूण 88 जणांवर गुन्हा दाखलं केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button