31 जुलै पर्यंत दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता
महाराष्ट्रात इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होऊन आता आठवडा होत आला, विद्यापीठ प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. मात्र अजून इयत्ता दहावीच्या निकालाचा पत्ता नाही. त्यामुळे आता दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती देताना जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 31 जुलै पर्यंत दहावीचा निकाल जाहीर केला जाईल असे सांगितले होते यानुसार पुढील आठवड्यात निकाल समोर येऊ शकतो.
दहावीच्या पेपर तपासणीचे काम पूर्ण झाले आहे, आता निकाल तयार करून जाहीर करण्याचा केवळ अवकाश आहे, हे काम सुद्धा लवकरच पूर्ण करून पुढील आठवड्यात निकाल समोर येईल अशी शक्यता आहे. विद्यार्थी व पालकांना mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल सुद्धा पाहता येणार आहे.
यंदा कोरोनाचे संकट लक्षात घेता महाराष्ट्र शिक्षण बोर्डाकडून दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. या एका विषयात वर्षभरातील परीक्षा व प्रकल्पांच्या अनुसार सरासरीचे मार्क दिले जाणार आहेत. तर दहावीचा निकाल कसा पहायचा ते पाहुयात.
- अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.
- या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.
- तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.
विद्यार्थ्यी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट सोबतच mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही निकाल पाहता येणार आहे.