ताज्या घडामोडीमुंबई

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये २५ ते ३० टक्के पाणीसाठा

मुंबई|मुंबईच्या शेजारच्या जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत, मात्र आर्थिक राजधानी मुंबई पाण्याबाबत अद्याप सुस्थितीत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये २५ ते ३० टक्के पाणीसाठा शिल्लक असून तो २२ जुलैपर्यंत पुरेसा आहे. तलावांमध्ये पुरेसे पाणी असले तरी मान्सूनचा लहरीपणा लक्षात घेता पाणी जपून वापरण्याची गरज आहे.

राज्यातील ग्रामीण भागांसह काही शहरांमध्ये पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. मात्र महापालिकेच्या नियोजनामुळे मुंबईकरांना पाणीटंचाईची भीती नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एप्रिल २०२२ अखेरपर्यंत २५ ते ३० टक्के सुमारे म्हणजे चार लाख ५० हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

सन २०२१च्या तुलनेत हा पाणीसाठा सुमारे तीन टक्क्यांनी जास्त म्हणजे ४७ हजार दशलक्ष लिटर इतका जास्त आहे. मुंबईला दररोज सर्वाधिक १८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील भातसा तलावात दोन लाख २० हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुळशी धरण क्षेत्रात सर्वाधिक ४३ टक्के तर, ठाणे जिल्ह्यातील मोडक सागरमध्ये ३८ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असल्याचे पालिकेच्या जलअभियंता विभागाकडून सांगण्यात आले.

…..

पाणी कपात नाही

धरणातील सध्याचा पाणीसाठा हा जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका असल्यामुळे मुंबईत पाणीकपात करावी लागण्याची शक्यता नाही, असे जल अभियंता विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सांगितले.

धरणातील पाणीसाठा

धरण पाणीसाठा टक्केवारी

(दशलक्ष लिटरमध्ये)

अप्पर वैतरणा ४५,७८२ २०.१६

मोडक सागर ५४,९१७ ४२.६०

तानसा ३७,५२७ २५.८७

मध्य वैतरणा ७९,१२३ ४०.८८

भातसा २,२०,१५० ३४.३३

तुळशी ३,५३२ ४३.९०

विहार ८,२२८ २९.७७

…..

पाण्‍याचा अपव्‍यय टाळा

-घरातील इतर कामे करत असताना नळ बंद ठेवा.

-गळके नळ, जलवाहिन्‍या त्‍वरित दुरुस्‍त करून घ्‍या.

-दाढी करताना, दात घासताना पाण्‍याचा नळ बंद ठेवा.

-वाहत्‍या नळाखाली कपडे-भांडी धुऊ नका .

-आंघोळीसाठी शॉवरचा वापर टाळा.

-नळाखाली बादली भरत ठेवून पाणी वाहू देऊ नका.

-आदल्‍या दिवशीचे पाणी शिळे समजून फेकू नका.

-गॅलरी, व्‍हरांडा व लादी धुण्‍याऐवजी ओल्‍या फडक्‍याने पुसून घ्‍या .

-भूजल पातळी सुधारण्‍यासाठी वृक्षारोपण करा.

-झाडांसाठी गरजेपेक्षा जास्‍त पाण्‍याचा वापर करू नका.

-वर्षा संचयन व विन‍ियोगाच्‍या पद्धतींचा वापर करा .

-पाण्‍याच्‍या टाक्‍या वाहू देवू नका. त्‍यांना बॉलकॉक बसवा.

माहिती स्रोत : मुंबई महापालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button