breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराष्ट्रिय

१००० रूपयांच्या नोटा पुन्हा चलनात येणार? RBI ने दिलं स्पष्टीकरण

RBI : रिझर्व्ह वँक ऑफ इंडियाने २००० रूपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत. ३० सप्टेंबर पर्यंत २००० रूपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश RBI ने दिले आहेत. त्यानंतर आता ५०० रूपयांच्या नोटाही बंद होणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. यावर आता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, ५०० रूपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा किंवा १००० रूपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहनही त्यांनी केलं आहे. तसेच त्यांनी २००० रूपयांच्या नोटांबद्दल मोठी माहिती दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी चलनात असलेल्या २००० रूपयांच्या ५० टक्के नोटा परत आल्याचे सांगितले आहे. ज्याची किंमत १ कोटी ८२ लाख कोटी रूपये आहेत.

हेही वाचा – मनसे पुणे लोकसभा निवडणूक लढवणार? वसंत मोरे यांचं मोठं विधान

२००० रूपयांच्या एकूण ३.६२ लाख कोटी रूपयांच्या नोटा चलनात होत्या. नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर २००० रूपयांच्या सुमारे १.८ लाख कोटी रूपयांच्या नोटा परत आल्या आहेत. चलनात असलेल्या २००० रूपयांच्या नोटांपैकी हे अंदाजे ५० टक्के आहे, असंही गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button