breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यााचा केंद्र सरकारचा विचार

अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात हळू हळू गोष्टी सुरु करण्यात आल्यात. त्यात फक्त आता शाळा कधी आणि कशा सुरु होणार हा सर्व विद्यार्थी आणि पालकांना पडणारा प्रश्न आहे. पण आता याबाबत केंद्र स्तरावर हालचाली सुरु झाल्यात. 1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर या काळात टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यााचा केंद्र सरकारचा विचार आहे. अनलॉक 4 च्या ज्या गाईडलाईन्स ऑगस्टअखेरीस येतील त्यात शाळांबाबतही नियमावली राज्यांना दिली जाऊ शकते.

साधारणपणे मार्च महिन्यापासून देशातल्या शाळा बंद आहेत. ऑगस्टमध्ये त्याला सहा महिने पूर्ण होतील. इतका सलग सहा महिने शाळा बंद ठेवल्यामुळे वेगवेगळे शैक्षणिक प्रश्नही निर्माण होत आहेत. शिवाय ऑनलाईन क्लासेसमध्येही अनेक अडथळे आहेतच. त्यामुळेच आता शाळांबाबतचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे, अशी केंद्र सरकारची धारणा आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही याबाबतच्या गाईडलाईन्सवर काम करणार आहे.

सुरवातीला दहावी ते बारावी या वयोगटातल्या शाळा आधी सुरु होऊ शकतात.
नंतर पाचवी ते दहावीचे वर्ग सुरु होऊ शकतात शाळा दोन शिफ्टमध्ये सुरु करण्याची शक्यता आहे. एक सकाळची शिफ्ट आणि दुसरी दुपारची शिफ्ट अशा दोन शिफ्टच्या मध्ये एक तासांचं अंतर असावं, ज्यात वर्ग सॅनिटायझ करण्यात येतील, पूर्व प्राथमिक, प्राथमिक वर्ग सुरु करण्याबाबत मात्र इतक्यात केंद्राचीही अनुकूलता नाही. अर्थात शाळा सुरु करण्याबाबत केंद्राने गाईडलाईन्स केल्या तरी अंतिम निर्णय हा राज्य सरकारांवरच सोपवला जाणार आहे. त्या त्या ठिकाणी कशी स्थिती आहे त्यानुसार राज्य सरकारं हा निर्णय घेतील, असंही केंद्राने म्हटलं आहे. जुलैमध्ये केंद्राने याबाबत जेव्हा सर्व्हे केला होता, तेव्हा बहुतांश पालकांनी शाळा सुरु करण्यास विरोधच दर्शवला होता. त्यामुळे बदलत्या स्थितीत त्यावर कसा प्रतिसाद येतो हे देखील पाहावं लागेल.

शाळा सरु करण्यासाठी केंद्र सरकारने स्वित्झर्लंडचं मॉडेल डोळ्यासमोर ठेवलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही सलग इतका काळ शाळा बंद असणं हे मुलांसाठी चांगलं नाही, असं म्हटलं आहे. इतका मोठा गॅप शाळेविषयी, अभ्यासाविषयी अनास्था निर्माण करु शकतो. शिवाय मुलींच्या बाबतीत बालविवाहासारखे प्रकारही ग्रामीण भागात वाढू शकतात, अशी भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने 1 जूनपासूनच अनलॉकची घोषणा करत काही गोष्टी टप्प्याटप्याने उघडायला सुरुवात केली. पण शाळा, कॉलेजेस, मेट्रो, लोकल यांचा यात समावेश झालेला नाही. पण कोरोना पूर्ण जाईपर्यंत या गोष्टी थांबवणंही शक्य नाही. शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाल्याने इतर अनेक प्रश्नही निर्माण होऊ शकतात. त्यामुळेच आता याबाबत अंतिम निर्णय काय होतो आणि त्यावर राज्य सरकारांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button