1 मार्चपासून महाविद्यालयाची सुरुवात राष्ट्रगीताने होणार
मुंबई |महाईन्यूज|
येत्या 1 मार्चपासून राज्यातील महाविद्यालयांची सुरूवात राष्ट्रगीताने होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
राज्य सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला. तरूण पिढीच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य केले जाणार आहे. याची सुरूवात मार्च पासून महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांची सुरूवात राष्ट्रगीताने होणार आहे.
या संदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले की, सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवसापासून सर्व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य आहे. अधिसूचनेनुसार महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीताने कामकाज सुरू होईल. महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्याचा हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. राज्यातील शाळांमध्ये दिवसाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली आणि शाळा सुटण्यापूर्वी देखील सामुहिक राष्ट्रगीताने होते. आता राज्य सरकारच्या नवीन अधिसूचनेनंतर महाविद्यालयांमध्ये देखील राष्ट्रगीताने सुरूवात होणार आहे.