हिंदूंवर हल्ले करणे आणि त्यांना शिव्या देणे म्हणजे धर्मनिरपेक्षता ? – देवेंद्र फडणवीस
नागपूर – मुंबईतील वांद्रे येथील प्रतिष्ठित ‘कराची स्वीट्स’च्या नावावरून शिवसेनाविरुद्ध मनसे असा सामना रंगला आहे. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘अखंड भारतावर आमचा विश्वास आहे, एक दिवस कराची भारताचा भाग असेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात ‘लव्ह जिहाद’ च्या घटना घडत आहेत. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी कायदा आणणे आवश्यक आहे. ते कॉंग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या आरोपासंदर्भात एका प्रश्नाला उत्तर देत होते. गेहलोत यांनी भाजपवर लव्ह जिहाद हा शब्द तयार करण्याचा आणि जातीय सलोखा बिघडविण्याचा आरोप केला होता. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘हे सर्व ढोंगी धर्मनिरपेक्ष लोक आहेत. हिंदूंवर हल्ले करणे आणि त्यांना शिव्या देणे म्हणजे धर्मनिरपेक्षता, असे त्यांचे मत आहे.’