breaking-newsताज्या घडामोडी

‘हिंगणघाट जळीतकांड’ – दुर्देवी मृत्यू झालेल्या पीडितेच्या कुटुंबाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला…

हिंगणघाट येथे घडलेल्या जळीतकांड प्रकरणात दुर्देवी मृत्यू झालेल्या पीडित तरुणीच्या कुटुंबाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला आहे.मुलीच्या उपचारावरील सर्व खर्च राज्य सरकार करेल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. हाच शब्द त्यांनी पूर्ण केला आहे … हिंगणघाट पीडितेच्या उपचासाठी झालेला ५ लाख ४३ हजार ४४१ रुपये खर्च आला. ही सर्व रक्कम राज्य सरकारने रुग्णालयाकडे सुपूर्द केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून रुग्णालयाला हा निधी देण्यात आला आहे.

हिंगणघाटच्या श्रीमती कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतिशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक असलेल्या तरुणीवर एका माथेफिरूने एकतर्फी प्रेमातून पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. ३ फेब्रुवारी रोजी हा धक्कादाय प्रकार घडल्यानंतर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त केला जात होता. या तरुणीची मृत्यूशी सुरु असणारी झुंज १० फेब्रुवारी रोजी संपली आणि तिचा दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यानच्या काळात या मुलीच्या उपचारावरील सर्व खर्च राज्य सरकार करेल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. हाच शब्द त्यांनी पूर्ण केला आहे.

हिंगणघाट पीडितेच्या उपचासाठी झालेला ५ लाख ४३ हजार ४४१ रुपये खर्च आला. ही सर्व रक्कम राज्य सरकारने रुग्णालयाकडे सुपूर्द केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून रुग्णालयाला हा निधी देण्यात आला आहे. राज्य सरकारने मदत जाहीर करण्याआधी पीडितेच्या कुटुंबाने उपचारासाठी ६० हजार रुपये खर्च केले होते. ही रक्कमही पीडितेच्या कुटुंबाला राज्य सरकारने परत केली आहे.

राज्य सरकारने ६० हजारांचा धनादेश पीडितेच्या वडिलांकडे सुपूर्द केला आहे. सोमवारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी विभागाचे प्रमुख सदस्य सचिव डॉ. कमलेश सोणपूरे यांनी हिंगणघाट उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडे पीडितेच्या कुटुंबाला देण्यासाठीचा धनादेश दिला. त्यानंतर लगेचच उपविभागीय महसूल कार्यालयाने हा धनादेश पीडितेच्या कुटुंबाच्या ताब्यात दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button