स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस संपवणे हे बापुंचे (महात्मा गांधी) स्वप्न, त्यासाठीच राहूल गांधींचा जन्म – योगी आदित्यनाथ
लातुर/उदगीर | महाईन्यूज | प्रतिनिधी
उदगीरच्या जिल्हा परिषद मैदानावर दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचार सभेसाठी भाजपाचे उमेद्वार डाॅ. अनील कांबळे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली. स्वातंञ्यानंतर काँग्रेस संपवण्याचे बापुजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच राहुल गांधींचा जन्म झाला आहे, अशा शब्दांत युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरोप केला.
यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, भाजपाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जो सन्मान दिला तो सन्मान काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी कधीच दिला नाही. महिला अत्याचारासंदर्भात बोलताना योगी म्हणाले ट्रिपल तलाक सारख्या जाचक अशा पृथेवर कायदा करुन मुस्लिम महिलांना सन्मान दिला.
मराठवाड्यामध्ये सध्या राहुल गांधींनी प्रचार सभा सुरू केली आहे. मात्र, मागील इतिहास पाहता जिथे कुठे राहुल गांधी जातात तिथल्या उमेद्वारांची जमानत सुद्धा जप्त होते. अशी फटकेबाजी करत स्वातंञ्यानंतर काँग्रेस संपवण्याचे बापुजींचे स्वप्ण होते. ते पूर्ण करण्यासाठीच राहुल गांधींचा जन्म झालाय, असेही ते म्हणाले. माञ, ज्याप्रमाणे योगी आदित्यनाथ यांच्या सभेला गर्दी असायला पाहीजे होती, तेवढी गर्दी सभेला दिसून आली नाही.