breaking-newsताज्या घडामोडीपुणे
स्थलांतरित कामगारांकडून प्रवासी भाडे आकारु नका : प्रकाश आंबेडकर
पुणे ।महाईन्यूज । प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातंर्गत स्थलांतरित कामगारांकडून कोणत्याही प्रकारचे प्रवासी भाडे आकारण्यात येऊ नये, तसेच त्यांना त्यांच्या नियोजित स्थळी सोडावे, अशी मागणी आम्ही केली होती. त्यावर शासनाने ST महामंडळामार्फत त्यांना घरी सोडण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, त्यांच्याकडून प्रवाशी भाडे आकारण्यात येणार असल्याची माहिती आज मिळत आहे. शासनाने राज्यांतर्गत स्थलांतरावर तातडीने लक्ष घालून त्यांना मोफतमध्ये घरपोच पाठवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.