breaking-newsमहाराष्ट्र

सोलापूरहून निघालेल्या मजुरांच्या एसटीला यवतमाळमध्ये भीषण अपघात

यवतमाळ : लॉकडाऊनच्या घरची वाट धरणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या अपघाताचं सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. सोलापूरहून कामगारांना झारखंडला घेऊन जाणाऱ्या एसटी बसची टिप्परला धडक बसून यवतमाळमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये बसमधील चौघा मजुरांचा जागीच मृत्यू झाला.

मजुरांना आपल्या मूळगावी घेऊन जाणाऱ्या एसटी बसने टिप्परला मागून धडक दिली. यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णीजवळील कोळवन गावानजीक हा अपघात झाला. सोलापूरहून निघालेले मजूर एसटी बसने झारखंड राज्यात जात होते.

ही धडक इतकी भीषण होती, की बसमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 22 जण जखमी आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारासाठी आर्णी आणि यवतमाळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button