breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
सीमेवरील सद्यस्थिती बदलण्याचे प्रयत्न सहन करणार नाही, मॉस्कोत झालेल्या बैठकीत भारताचा चीनला स्पष्ट इशारा
मॉस्को: लडाखमधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बहुप्रतीक्षित उच्चस्तरीय बैठक पार पडलेली आहे. सीमेवरील तणाव संपुष्टात आणण्यासाठी भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात बैठकीमध्ये 5 मुद्द्यांवर सहमती झालेली आहे.
लडाखमधील सीमेच्या सद्यस्थितीत बदल करण्याचा चीनने कोणताही प्रयत्न केल्यास, त्याकडे कानाडोळा केला जाणार नाही, असे जयशंकर यांनी वांग यी यांना स्पष्ट शब्दात सांगितले. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झालेली आहे. दोघे तिथे शांघाय सहकार संघटनेत सहभागी होण्यासाठी ते रशिया दौऱ्यावर होते.