breaking-newsमनोरंजन

‘साता जल्माच्या गाठी’ मालिकेत नवं वळण

‘साता जल्माचं लव्ह हाय आपलं’ असं म्हणत एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलेल्या श्रुती आणि युवराजचं नातं निर्णायक वळणावर येऊन ठेपलंय. श्रुतीचं लग्न युवराजशी न करता युवराजचा चुलत भाऊ रघुशी करायचा निर्णय नंदादेवींनी घेतलाय. या निर्णयामागे खूप मोठं षडयंत्र आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नंदादेवींच्या या निर्णयात युवराजनेही साथ देण्याचं ठरवलं आहे.

ज्या युवराजवर श्रुतीने जीवापाड प्रेम केलं तोच युवराज श्रुतीचा विश्वासघात करणार आहे. युवराजचा हा निर्णय न पटणारा आहे. नंदादेवींची ही अट युवराजने का मान्य केली? श्रुतीच्या प्रेमासाठी कायपण करायला तयार असणारा युवराज तिचं लग्न रघुशी करण्यासाठी का तयार झाला? श्रुती आणि युवराजच्या प्रेमाचं पुढे काय होणार? या प्रश्नांची उत्तर ‘साता जल्माच्या गाठी’च्या पुढील भागांमध्ये उलगडणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button