breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

सातारच्या जावळी तालुक्यात उद्यापासून ७ दिवस जनता कर्फ्यू

सातारा – जावळी तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून अनेक गावात कोरोना रुग्ण सापडत आहेत. या तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेढा शहरातही कोरोनाने दीड शतक पार केले आहे. तालुक्यातील ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उद्या मंगळवार ८ सप्टेंबर ते सोमवार १४ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण तालुक्यात कडक जनता कर्फ्यू पाळण्याचा लोकांनी लोकांसाठी निर्णय घेतला आहे. कोरोनाची दाहकता वाढली असून बेड मिळत नाहीत म्हणून नागरिकांनी आणि व्यापार्‍यांनी सहकार्य करून कडक बंद पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते, व्यापारी, पदाधिकारी, सरपंच, अधिकारी व पत्रकार यांच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. या सात दिवसांच्या बंदमुळे व्यापार्‍यांचे नुकसान होणार असले तरी सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बंद पाळणे आवश्यकच आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button