breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“आपला नंबर येईपर्यंत, आणि त्याची व्यवस्था होईपर्यंत मजुरांनी धीर धरावा, जीव धोक्यात घालून प्रवास करु नये”- अजित पवार

परप्रांतीय मजुरांना त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. केंद्र व सबंधित राज्यांच्या सहकार्यानं सर्व मजूरांना त्यांच्या राज्यांत पाठवण्यात येत आहे, मात्र आपला नंबर येईपर्यंत, त्यासाठीची व्यवस्था होईपर्यंत मजुरांनी धीर धरावा, जीव धोक्यात घालून असुरक्षित प्रवास करु नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. तसेच जालना-औरंगाबाद रेल्वे मार्गावर झालेल्या अपघाताबद्दल त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्रानं गेले दीड महिने राज्यात ठिकठिकाणी अडकलेल्या साडे सहा लाख मजुरांच्या अन्नपाणी, निवारा, वैद्यकीय उपचारांची सोय केली असून ही व्यवस्था आजही सुरू आहे, यापुढेही सुरू राहील. महाराष्ट्रात काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांची राज्य सरकार काळजी घेत असताना काहींचा असा अपघाती मृत्यू होणं दुर्दैवी, क्लेषदायक आहे, तसेच महाराष्ट्रात अडकलेल्या व आपापल्या राज्यात, घरी जावू इच्छिणाऱ्या मजूर बांधवांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. केंद्र आणि संबंधित राज्यांच्या सहकार्यानं ही जबाबदारी पार पाडली जात आहे. टप्प्याटप्याने सर्वांना आपापल्या राज्यात जाता येणार आहे. ज्यांची इच्छा आहे त्या सर्वांना आपापल्या घरी जाता येईल. परंतु, त्यासाठी घाई करु नये. ही घाई जीवघेणी ठरु शकते. मजूर बांधवांनी जीव धोक्यात घालून असुरक्षित प्रवास करु नये, करोनाच्या संकटावर आपण सर्वांनी मिळून लढायचं आहे, जिंकायचं आहे. त्यासाठी प्रत्येकानं स्वत:ची, कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. सर्वांनी सुरक्षितता बाळगली पाहिजे, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button