breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

सरपंच जनतेतून निवडण्याचा निर्णय रद्द करण्याला सरपंच संघटनेचा विरोध…

अहमदनगर | महाईन्यूज |

ग्रामपंचायतीच्या सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा कायदा फडणवीस सरकारने केला होता… मात्र ठाकरे सरकरानं हा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंच जनतेतूनच निवडला जावा’ अशी महाराष्ट्र राज्य सरपंच संघटनेची मागणी आहे. त्यामुळे सरकार रद्द करत असलेल्या निर्णयाला सरपंच संघटनेने विरोध केला आहे. 


सरकार ने हा निर्णय रद्द करू नये यासाठी सरपंच परिषदेने आंदोलन सुरू केले असून शेवगाव येथे परिषदेतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला.

आम्ही राजकारण करत नाही; पण सरकारला नवे नेतृत्व तयार होऊ द्यायचे नाही काय? सरकार जर आमच्यासोबत जाणीवपूर्वक हीनतेने वागत असेल तर सरकारला आपापल्या गावात योग्य जागा दाखवून देऊ. आम्ही पुन्हा सरकार मधील लोकांना भेटणार असून विनंती करणार आहोत. मात्र, तरीही सरकार निर्णयावर ठाम राहिले तर प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात मोर्चे काढू, असा इशारा सरपंच परिषदचे राज्य अध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिला आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button