breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

सीमाप्रश्न ः केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या बैठकीत नक्की काय झालं? अजित पवारांचा सवाल

मुंबई ः

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरून नागपूर हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आज वादळी ठरत आहे. एकीकडे कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना आज कर्नाटकात जाण्यापासून कर्नाटक पोलिसांनी रोखले आहे. तर दुसरीकडे विधानसभेतही विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हा मुद्दा लावून धरला आहे. अजित पवार यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच कर्नाटक सरकारची दडपशाही सुरु असल्याचा आरोप करत याविरोधात राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने ठोस पावलं उचलावी, अशी मागणी केली आहे.

विधानसभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली. कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावर, काही गाव ठराव करत आहेत किंवा काही बातम्या येत आहेत त्याबाबत एक बैठक बोलावली होती, या बैठकीत सीमाप्रश्नावर चर्चा झाली आणि महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्यांना अडवण्यात येणार नाही अशी भूमिका घेण्यात आली. पण या चर्चेदरम्यान नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केले आहे.

सुप्रीम कोर्टात हे प्रकरण सुरु आहे, सुप्रीम कोर्टात ते लढत आहेत आपण लढत आहे, निकाल आपल्या बाजूने लागावा असं तमाम महाराष्ट्राच्या जनतेला वाटतं. पण तिथे जे ठरलं ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना माहित आहे. शंभूराजे देसाई आणि चंद्रकांत पाटील ६ डिसेंबरला बेळगावला जाणार होते पण महापरिनिर्वाण दिन असल्याने वातावरण खराब होऊ नये म्हणून ते गेले नाही. पण त्यानंतर ठरलेलं होत की कोणी कोणाला इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येण्य़ास बंद करायची नाही. परंतु आपल्या लोकसभेचे एक मेंबर तिथे जात असताना कर्नाटक जिल्हाधिकाऱ्यांना त्यांना बंदी केली, महाराष्ट्र एकीकरण समिती तिथे भांडतेय, मराठी भाषिक भांडत आहेत अशावेळी महाराष्ट्राने एकमताने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे

अमित शाहांच्या बैठकीत अडवणूक न करण्याचे ठरलेले असताना कर्नाटकचे जिल्हाधिकारी अशी प्रकारची बंदी कशी आणू शकतात? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे. कोर्टात जो काही निकाल आहे लागेल परंतु अशाप्रकराची दडपशाही आपण खपवून घेता कामा नये, कर्नाटकच्या खुरापती सातत्याने सुरु आहेत त्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंचं कलेक्टर ऐकत नाही असं तर होणार नाही. कर्नाटकात मंत्र्यांना अडकवल जात आहे, असही अजित पवार म्हणाले. यावेळी विरोधकांनी याच मुद्द्यावरून गदारोळ घातलण्याचा प्रयत्न केला.

तसेच सभागृहात काही सदस्य पक्षाची चिन्हे लावून आले. त्यावर आक्षेप घेत अशी प्रथा पाडू नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button