सरकारच्या उत्तराची देश कधीपर्यंत वाट पाहणार? राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
नवी दिल्ली | राहुल गांधी यांनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी काल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला “ पुढच्या वर्षभरासाठी केंद्र सरकारकडे ८० हजार कोटी रुपये आहेत का? कारण लस विकत घेऊन, ती प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्यासाठी इतका खर्च येणार आहे. आता आपल्याला या आव्हानाचा सामना करायचा आहे.” असे अदर पूनावाला यांनी काल टि्वट करत विचारले होते. आपल्या टि्वटमध्ये त्यांनी पीएमओ इंडियला टॅग केले आहे.ला विचारलेल्या प्रश्नावरून एख ट्वटि केलं आहे. त्यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी म्हणतात, “ प्रश्न तर योग्य आहे, मात्र सरकारच्या उत्तराची देश कधीपर्यंत वाट पाहणार? जर, कोविड अॅक्सेस स्ट्रॅटेजीच मन की बात असती. ” अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. सोबतच अदर पूनावाला यांनी आरोग्य मंत्रालयास केलेल्या प्रश्नाबाबतचे वृत्त देखील संदर्भासाठी जोडले आहे.