breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

श्रमिक ट्रेन रिकाम्या गेल्यानं राज्य सरकारला 42 लाखांच नुकसान

राज्यात अडकलेल्या स्थलांतरितांना त्यांच्या गावी परत जाता यावं यासाठी गेल्या महिन्यात सोडण्यात आलेल्या बहुतांशी विशेष श्रमिक ट्रेन रिकाम्या गेल्यात. त्यामुळे राज्य सरकारला ४२ लाख रुपयांचं नुकसान झालंय. याबाबतची माहिती राज्य सरकारच्यावतीने महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी उच्च न्यायालयाला दिली.

आता स्थलांतरीत त्यांच्या मूळ गावी परत जाण्याऐवजी आधी गावी गेलेले स्थलांतरीत पुन्हा महाराष्ट्रात येत आहेत, अशी माहिती कुंभकोणी यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाला दिली.

गेल्या महिन्यात हजारो लोकांसाठी श्रमिक ट्रेन सोडण्यात आली. त्या ट्रेनमधून केवळ ३,५५१ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे राज्य सरकारला ४२ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. ३८३ स्थलांतरितांना त्यांच्या गावी जाता यावे, यासाठी पुण्याहून विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आली. प्रत्यक्षात २४ कोचच्या ट्रेनमधून केवळ ४९ लोकांनी प्रवास केला, अशी माहिती कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिली.कोरोनाच काळात लाखो लोक महाराष्ट्रातून त्यांच्या मूळ गावी गेले. मात्र, आता तीच लोक पुन्हा महाराष्ट्रात परतत आहेत, असे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले.

दरम्यान आणखी किती स्थलांतरित त्यांच्या मूळ गावी जाण्यास तयार आहेत, याची आकडेवारी याचिकाकर्त्यांनी काढावी आणि ते ज्या राज्यात जाऊ इच्छित आहेत, ती राज्ये त्यांना परत घेणार आहेत का? याची माहितीही याचिकाकर्त्यांनी काढावी, असे न्यायालयाने म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button