शॉर्टकट मारावे लागले की रात्री कामे करावी लागतात, मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
मुंबई | येत्या काळात प्रत्येक पाऊल शांततेने उचलावं लागणार आहे. ओरडून बोलल्याने कोरोना होतो, असे कालच वाचले. शॉर्टकट मारावे लागले की रात्री कामे करावी लागतात, आम्ही रात्रीची कामे दिवसा करायला लागलो, असा अप्रत्यक्षरित्या टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.
सभागृहात पत्रकार अर्णब गोस्वामींवर हक्कभंग आणण्यापेक्षा करोनावर, शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर, पूरस्थितीवर चर्चा होणे आवश्यक आहे. ती होणार नसेल तर आम्ही इथे आलो कशाला, असा सवाल करीत फडणवीस यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहे.करोना संकटाच्या काळात सरकारवर टीका करण्याची आम्हाला हौस नाही. या काळात आम्ही संयमानेच वागेलो आहोत. मात्र, सरकार करोनाबाबत गंभीर असल्याचे दिसत नाही. असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे.
त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. प्रत्येक पाऊल शांततेने उचलावं लागणार आहे, ओरडून बोलल्याने कोरोना होतो, अस म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. तर शॉर्टकट मारावे लागले की रात्री कामे करावी लागतात, आम्ही रात्रीची कामे दिवसा करायला लागलो, अस म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर जोरदार टोलेबाजी केली आहे.