शेतकरी हिंसक झाला तर जबाबदारी भाजप सरकारची – शरद पवार
मुंबई – आतापर्यंत शांत असलेले शेतकरी जर हिंसक झाले तर सर्व जबाबदारी भाजप सरकारची असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.गेली जवळपास अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर देखील शेतकऱ्यांनी आपले आंदोलन चालूच ठेवलेले आहे. याच पार्श्वभूमीवर आता शांत असलेले शेतकरी जर हिंसक झाले तर सर्व जबाबदारी भाजप सरकारची असेल, असे म्हणत शरद पवारांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
शेतकऱ्यांना शांततेचा मार्ग सोडल्यास देशात समस्या निर्माण होईल. त्याची जबाबदारी भाजप सरकारची असेल- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार…
ही योजना आहे कि इच्छा?… काहीही असली तरी ती पूर्ण होणार नाही एवढे निश्चित… pic.twitter.com/HYsABL0PDt
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 5, 2021
आज ज्यांच्या हाती सत्ता आहे ते संवेदनशील नाहीत सर्व खासदार शेतकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी चालले होते, तर त्यांना अडवलं गेलं. जर लोकशाहीत असं घडत असेल तर याची मोठी किंमत सरकारला चुकवावी लागेल, असेही ते म्हणाले.दरम्यान, शरद पवारांच्या या टीकेनंतर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. शरद पवारांची ही योजना आहे कि इच्छा?… काहीही असली तरी ती पूर्ण होणार नाही एवढे निश्चित, असे भातखळकर म्हणाले.