breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली सरकारकडून ‘सरसकट धोकेबाजी’- देवेंद्र फडणवीस

मुंबई | महाईन्यूज

महाविकास आघडीच्या सरकराने केलेली कर्जमाफीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधलेला आहे. सरकारने केलेली कर्जमाफी म्हणजे अटी व शर्ती लागू अशाप्रकारे असून, कर्जमाफीच्या नावाखाली ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची ‘सरसकट धोकेबाजी’ केली असल्याचा आरोप फडणवीस यांनी केलेला आहे. ‘शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करू असे सांगणाऱ्यांनी नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र ही घोषणा म्हणजे अटी व शर्ती लागू अशाप्रकारे आहे.

कर्जमाफीच्या आदेशात 2015 ते सप्टेंबर 2019 मधीलच कर्ज असावे असा उल्लेख केला गेला आहे. तर हे कर्ज थकबाकी व पिक कर्ज असायला हवे आहे. कर्जमाफीच्या योजनेत मुदत कर्ज असणाऱ्यांना लाभ घेता येणार नाही, अशा अनेक अटी कर्जमाफीसाठी लावण्यात आल्या असल्याचा आरोप फडणवीस यांनी केलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button