शिवसेनेच्या हालचालींना वेग; ‘राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रण द्यावे’
मुंबई: भाजपाने नुकतीच पत्रकार परिषद घेऊन भाजपा सत्तास्थापन करणार नसल्याचे भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या या निर्णयानंतर शिवसेनेच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत तातडीने मातोश्रीवर दाखल झाले आहे. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरल्याने राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. मात्र भाजपाकडे सत्तास्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा नसल्याने सरकार स्थापन करण्यास त्यांनी नकार दिला आहे. यामुळे आता राज्यपाल 56 जागा जिंकून निवडणुकीत दूसरा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला राज्यपाल सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं जाऊ शकतं. त्यामुळे शिवसेनेकडून जोरदार तयरी करण्यात येत आहे. त्यातचं शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण राज्यपालांनी द्याव असं मत व्यक्त केलं आहे.