breaking-newsमुंबई

शिवसेना सत्तेत असूनही जनतेच्या प्रश्नांवर भांडत असल्याचा खोटा आव आणते- धनंजय मुंडे

मुंबई: एेन दिवाळीच्या सुट्टीत राज्य परिवहन महामंडळाने सरसकट दहा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून पुढील महिन्यांतील 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या दरम्यान 20 दिवसांसाठी भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे. यंदा मात्र दरवर्षीप्रमाणे सेवाप्रकार निहाय 10,15 आणि 20 टक्के अशी भाडेवाढ न करता सरसकट 10 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. “शिवसेना सत्तेत असूनही कायम आपण जनतेच्या प्रश्नावर भांडत आहोत, असा खोटा आव आणत आहे, अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, “दरवर्षीप्रमाणे गर्दीच्या हंगामात (दिवाळी सुट्टीच्या कालावधीत) एस.टी ची सरसकट १०% भाडेवाढ होणार असून ती १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर अशी २० दिवसासाठी लागू करण्याचा निर्णय एस. टी. महामंडळाने घेतला आहे. सरकारने राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घ्यावी, कारण एस.टी. मधून फक्त गरीब, सर्वसामान्य प्रवास करतात, वाढीव भाड्याचा त्त्यांनाच भुर्दंड सोसावा लागणार आहे त्यामुळे ती यावर्षी रद्द करावी.

धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर देखील टीकास्त्र सोडले, “शिवसेना सत्तेत असूनही कायम आपण जनतेच्या प्रश्नावर भांडत आहोत असा खोटा आव आणते, गरीब आणि सर्व सामान्य जनतेची त्यांना खरोखरच काळजी असेल तर त्यांच्या मंत्र्यांच्या ताब्यात असलेल्या खात्यातील दरवाढ रद्द करून दाखवावी, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी तसे आदेश द्यावेत. असे आवाहनही त्यांनी दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button