breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

शाश्वत प्रगतीसाठी लोकसहभाग आवश्यक – श्रावण हर्डिकर

शहर विकासाचे धोरण व परिवर्तन आराखड्यावर चर्चा
राहण्यायोग्य शहर बनविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन

पिंपरी ( महा ई न्यूज ) – लोक सहभागातून समावेशक आणि शाश्वत प्रगती करायला हवी, २०३० पर्यंत पिंपरी चिंचवड शहराला भारतातील सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर बनविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे नागरिकांनी शहर विकासावर आपल्या सूचना व कल्पना ७ दिवसांत पालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागात लेखी स्वरुपात अथवा [email protected] या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर कराव्यात, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहरातील विविध समाजिक संस्थांचे पदाधिकारी यांच्या समवेत शहर विकासाचे धोरण व परिवर्तन आराखड्यावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. महापालिका स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या चर्चा सत्रास अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, प्रभारी सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, पॅलेडीयम संस्थेच्या बार्बरा स्टॅंकोव्हीकोवा, किरण पंडित, मधुरा पाठक, रॉकी ओलांडे, ज्येष्ठ नागरिक महासंघ, संस्कार प्रतिष्टान, पोलिस मित्र संघटना, अविरत फौंडेशन, जलदिंडी, दक्षता मित्र मंडळ, पर्यावरण संवर्धन समिती, प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, राजश्री शाहू महाविद्यालय, इंदिरा कॉलेज, बाबूरावजी घोलप महाविद्यालय, रोटरी क्लब वालेकरवाडी/अंघोळीची गोळी, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, निरामय हॉस्पिटल, बिर्ला हॉस्पिटल आदी संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी चिंचवड शहर विकासाचे धोरण व परिवर्तन आराखड्याचे सादरीकरण केले. यामध्ये शहरातील वाहतूक व्यवस्था, पर्यावरण, राहणीमान, क्रीडा, पर्यटन, सांस्कृतिक उपक्रम, कायदा व शासन व्यवस्था, माहिती तंत्रज्ञान, दळणवळण यंत्रणा, आर्थिक विकास याबाबत नागरिकांनी सिटी सर्वे मध्ये नोंदवलेली मते सादर करण्यात आली. तसेच २०३० पर्यंतचे पिंपरी चिंचवड शहराचे ध्येय व उदिष्ट मांडण्यात आली. शहर विकासाचे ध्येय व उदिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर आराखडा उपस्थितांसमोर सादर केला.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, कष्टकरी कामगारांनी आपल्या घामाने हे शहर मोठे केले आहे. राज्याच्या सर्व भागातील नागरिक पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्यास आहे. मागील दोन दशकात वेगाने वाढणारं शहर म्हणून आपल्या पिंपरी चिंचवडचा देशात तिसरा क्रमांक लागतो. शहर विकासाचा दर ७०% इतका असून तो इतर शहरांपेक्षा जास्त आहे.
परंतू बदलत्या काळामुळे सध्यस्थितीत अनेक उद्योग शहराबाहेर जात आहेत. रहिवासी शहर म्हणून नविन ओळख प्राप्त होत आहे. त्यामुळे शहर विकासाबरोबरच झोपडपट्ट्या, अनधिकृत बांधकाम, आरोग्य, शिक्षण आदी बाबतच्या समस्या देखील वाढत आहेत. त्या सोडविण्यासाठी एकात्मिक आराखडा तयार करावा लागेल.

२०३० पर्यंत पिंपरी चिंचवड हे देशातील क्र. १ चे सर्वसमावेशक, आर्थिकदृष्ट्या प्रगत व राहण्यायोग्य शहर बनविण्याचे ध्येय आहे. तसेच व्यवसायासाठी सुलभ व सोपी कार्यप्रणाली राबविणे, नागरिकांची जीवनशैली, गुणवत्ता सुधारण्यास प्रोत्साहन देण्यासाठी नागरिक केंद्रित स्मार्ट प्रशासन सुनिश्चित करण्याचे उदिष्ट महानगरपालिकेने ठेवले आहे. कार्यक्षमता, सचोटी, जबाबदारी, संघटीत कार्य संवेदनशीलता हि मुल्ये आत्मसात करूनच निश्चित केलेले ध्येय व उदिष्ट साध्य होऊ शकते असेही ते यावेळी म्हणाले.

शहर विकासाचा सर्व समावेशक आराखडा तयार करणेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी शहर विकासाबाबतच्या आपल्या सूचना व कल्पना ७ दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामध्ये लेखी स्वरुपात अथवा [email protected] या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्यात असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button