breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

व-हाड घेऊन लग्नाला निघालेल्या बसला भीषण अपघात, 18 जणांचा मृत्यू

मुंबई | महाईन्यूज | ऑनलाईन टीम

राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात बुधवारी पहाटे झालेल्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर, डझनभरहून अधिक लोकांना नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले आहे. पापाडी गावाजवळ प्रवाशांनी भरलेली बस मेज नदीत कोसळल्याने हा अपघात झाला आहे. लेकेरी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी बचावकार्य सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोटाच्या दाडीबारी येथील एका कुटुंबातील सदस्य सवाई माधोपूर इथे लग्न समारंभासाठी जात होते. दरम्यान, कोप-लालसोट मेगा महामार्गावर पापरी गावाजवळ बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नदीत कोसळली. पुढचा टायर थोडा बाहेर आल्यामुळे बस अनियंत्रित झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

बुंदीचे जिल्हाधिकारी अंतरसिंह नेहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. एनडीआरएफच्या टीमकडून बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. आतापर्यंत 12-13 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बसमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

कोटा येथील मुरारीलाल धोबी आपल्या कुटूंबासह सवाई माधोपूरला जात होते. तिथे त्यांच्या भाच्याचा लग्न सोहळा पार पडणार होता. दरम्यान, वाटेत हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक लोकांची गर्दी जमली होती. स्थानिक लोकांकडूनही एनडीआरएफ टीमच्या सदस्यांना मदतकार्य सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button