breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विरोधकांवर दबाव आणण्यासाठी सरकार ‘ईडी’चा वापर करते – शरद पवार

मुंबई | महाईन्यूज

कोणत्याही प्रकारे सत्ता आपल्या हातात कशी राहील, यासाठी वाट्टेल त्या प्रकारचा खटाटोप सत्ताधारी पक्ष करत आहेत. त्यासाठी ‘ईडी’चा पुरेपूर वापर करून घेत आहेत. विरोधकांवर दबाव आणण्यासाठी ‘सीबीआय’, ‘ईडी’ यांसारख्या संस्थांचा वापर केला जात आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भाजप सरकारच्या भूमिकेबाबत आपले मत मांडले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या धोरणांवर टीका करताना पवार म्हणाले की, कधी नव्हे ते या निवडणुकीच्या वेळी फोन-टॅपिंगचे प्रमाण वाढल्याचे दिसते. निवडणुकीत आम्हाला मदत करा असं जरी कोणी कोणाशी बोलले; तरी संध्याकाळी त्यांच्याकडे ‘ईडी’चे पथक दाखल होते. अमाप साधनसंपत्तीचा वापर सत्ताधाऱ्यांकडून सध्या केला जात आहे. पण विरोधकांना मात्र, या सर्वांबाबत कशाप्रकारे मर्यादित ठेवले जाईल, याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक थोडीफार विरोधकांसाठी प्रतिकुल परिस्थितीची आहे.

लोकसभा निवडणूक भाजपाकडून आक्रमकपणे लढवली गेली. राष्ट्रसुरक्षेच्या मुद्याचा गवगवा करून निवडणूक लढवण्यात आली. देशाच्या संरक्षणाचे मुद्दे हे केवळ एका पक्षाचे नसतात. सगळा देश यात समाविष्ट असतो. मात्र, आज मुद्दाम असे प्रश्न निर्माण करून त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी व विरोधकांना नाऊमेद करण्यासाठी या मुद्द्यांचा वापर केला जात आहे. अशी परिस्थिती पूर्वी कधीच नव्हती. पण आता ती परिस्थिती दुर्देवाने आली आहे, अशी खंत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button