breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
लडाखच्या गालवान खाडीत भारत चीन सैनिकांमध्ये चकमक; भारताच्या कर्नलसह दोन जवान शहीद
लडाख | भारत आणि चीनच्या वादग्रस्त सीमेवर तणाव इतका वाढला की सोमवारी रात्री उशीरा गोळीबार झाला. दोन्ही देशांमध्ये झालेल्या या फायरिंमध्ये भारताच्या कर्नलसह दोन आर्मी जवान शहीद झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी यासंदर्भातील माहिती जारी केली. भारत आणि चीन सीमेर दोन्ही देशांमध्ये फायरिंगची 53 वर्षांनंतरची ही पहिलीच घटना आहे.
11 सप्टेंबर 1967 रोजी सिक्किम येथली नाथू-ला परिसरात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गोळीबार झाला होता. यानंतर 16 सप्टेंबर 1967 मध्ये सुद्धा अशाच प्रकारची चकमक उडाली होती. ऑक्टोबर 1967 पर्यंत हा वाद सुरूच होता. चीनने त्यावेळी केलेल्या गोळीबारात आपले 32 सैनिक मारले गेल्याचा दावा केला होता. तर भारताचे 67 जवान शहीद झाले होते. चो-ला परिसरात झालेल्या चकमकीत आणखी 36 भारतीय जवान शहीद झाले होते.