breaking-newsमुंबई
रेल्वे रुळाला तडा गेल्याने ‘मरे’ विस्कळीत
मुंबईकडे येणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसारा आणि उंबरमाळी स्थानकादरम्यान रुळाला तडा गेल्यामुळे मुंबईकडे येणारी लोकल वाहतूक उशीराने सुरू आहे.
सकाळी साडेनऊ सुमारास रुळाला तडे गेल्याचं समोर आल्यानंतर रुळाच्या दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर सुरू केल्याचं समजतंय. पण याचा फटका लांब पल्ल्यांच्या गाड्यांनाही बसला आहे. तर कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे आणि लोकल गाड्या खोळंबल्या आहेत. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.