राम मंदिर वाद/ मध्यस्थ समितीच्या अहवालात तोडगा निघाला नाही, 6 ऑगस्टपासून नियमित होणार सुनावणी
नवी दिल्ली- अयोध्या जन्मभूमी वाद चर्चेतून सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मध्यस्थ समितीने गुरुवारी सुप्रीम कोर्टात सील बंद पाकिटात आपली रिपोर्ट सादर केली. चीफ जस्टिस रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधिशांच्या बँचने सांगितले की, मध्यस्था समिती तोडगा काढण्यास अयशस्वी झाली आहे. आता याप्रकरणी 6 ऑगस्टपासून नियमित सुनावणी होणार आहे.
न्यायालयाने एका याचिकेवर 11 जुलैला समितीकडून ही रिपोर्ट मागितीली होती. सोमवारी सगळ्या दोन्ही पक्षांमध्ये दिल्लीमधील उत्तर प्रदेश सदनात शेवटची मिटींग झाली होती. 18 जुलैला मध्यस्थ समितीने स्टेटस रिपोर्ट कोर्टात सादर केली. तेव्हा सीजेआयने म्हटले होते की, आता मध्यस्था समितीच्या रिपोर्टला रेकॉर्डवर घेतले जाऊ शकत नाही. समितीने लवकरच शेटची रिपोर्ट कोर्टात सादर करावी.
याचिकाकर्त्यांनी रोज सुनावणीची मागणी केली होती
याआधी याचिकाकर्त्यांनी म्हटले होते की, मध्यस्था पॅनलकडून कोणताच सकारात्मक उपाय निघाला नाहीये. त्यामुळेच कोर्टाने लवकर निकाल लावण्यासाठी रोज सुनावणी घेण्याची गरज आहे. यावर कोर्टाने म्हटले होते की, मध्यस्था समितीची रिपोर्ट पाहिल्यानंतरच रोज सुनावणी घ्यावी का नाही, यावर निर्णय घेण्यात येईल. अयोध्या वादतील पक्षकार गोपाल सिंह विशारदच्या याचिका आणि लवकर सुनावणीवर निर्मोही अखाड्यानेही समर्थन दिले होते.