राज्यात २४ तासांत ४ हजार २६८ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह
मुंबई – राज्यात शुक्रवारी ४ हजार २६८ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर 2774 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यातील एकूण १७ लाख ४९ हजार ९७३ रुग्णांनी आत्तापर्यंत कोरोनावर मात केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९३.४६ टक्के झाला आहे. तर राज्यात आज ८७ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील मृत्यू दर सध्या २.५७ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १५ लाख ७० हजार १३७ नमुन्यांपैकी १८ लाख ७२ हजार ४४० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ३२ हजार २८८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ५ हजार १२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ७३ हजार ३१५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
आज राज्यात ४ हजार २६८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८ लाख ७२ हजार ४४० इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या ८७ मृत्यूंपैकी ३८ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर २३ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित २६ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीपेक्षा कमी कालावधीतले आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.